Friday, April 9, 2010

हिरवं सपान

बा,
मला फक्‍त यवढंच सांग,
माती खाटी झाल्यावं
तु ताटी का बांदली नाय...

मला दिसायची
पाहटं तुह्या हाती इळा दोरी
डोक्‍यात सदा औताची गणगण
कधी बळीचा तुटका फाळ
तर कधी पिचाकल्यालं फारुळं

तुला कधी खुपली नाय का?
आखरावरली हाडकी जनावरं
वावरातली बारमाय भॅगाडं
बायकुच्या डोई शेणकुराची पाटी
आण्‌ लेकराची फाटकी बंडी

मातीइनाबी जिता यईल
नदीइनाबी पोहता यईल
आसं तुला वाटलंच नाय का ?

शॅजारचा हिऱ्या ममयला ग्याला
गोदीवं का धक्‍क्‍यावं, मुकादम झाला
त्याचा करकरीत सदरा पाहून
मुंगीनं मुतात बुडण्यापेक्षा
ताठ मानंचा हमाल व्हावं
आसंबी तुला वाटलं नाय ?

कोरड्या घामाच्या रापल्या मुठीत
संसाराच्या भाग्यरेघा बुडविताना
तुला कायचं कसं वाटलं नाय ?

का कोरड्या मातीत निजून तुला
हिरवं सपान पडलंच नाय...

मला फक्‍त एवढंच सांग,
माती खाटी झाल्यावं
तु ताटी का बांधली नाय...

(संतोष, 10-4-10, 11 pm शनिवारवाडा)

1 comment:

Vinod L Gunjal said...

ekach number sir.......

vichar karayla lavnari poem aahe.

keep it up.........

regards,
vinod