Thursday, December 25, 2008

मुकी माती

कधी काळी मुक्‍या शब्दांशी
तो नेहमीच भांडायचा,
त्याचे शब्दन शब्द
धाटा धाटातून डुलायचे...

सांज सकाळी
काळ्या कागदावर
तो रेघोट्या मारत बसायचा
कधी आईकडं,
तर कधी बापाकडं
नुसतं पाहत राहायचा...

आई रुसली,
बाप कोपला,
पण हार कधी मानली नाही,
चूल कधी विझली नाही...

अखेर...
उन्हाळ्यामागून उन्हाळे गेले
पण ऊन कधी सरलंच नाही
नियती कधी फिरलीच नाही....

नशिबाच्या भोगापूढं
घाम गाळून थकला
दाही दिशा फिरून फिरुन
काळापूढे टेकला...

आयुष्याचा लेखाजोखा
पेपरात दोन ओळीत आला...
कर्जाला कंटाळून
शेतकऱ्याची आत्महत्या...

(Jan 2003, Saralgaon, Tal - Murbad, Dist - Thane.)
--संतोष

1 comment:

Santosh Dukare said...

sep 2009 - Bhartiya Krushak samaj cha traimasikat Prasidha.

~Santosh Dukare~